केरुजी अर्जुन घेगड़े हे "महाराचं प्वार बिट्या लई हुशियार " या प्रसिद्ध कवनासाठी आम्बेडकरी जनतेत खुप मशहूर आहेत. पहिल्या पिढीतील हे जलसाकार होते. घेडगे हे उपजतच कवी आणि शाहिर होते. १९३४ च्या सुमारास त्यानी आपल्या साथीदारांसोबत वडाळा, मुम्बई येथे स्वतःचे जलसा मंडळ स्थापन केले. १९३१ क्या सुमारास एक सत्त्याग्रहाचा पोवाड़ा लिहिला. बहुधा ही त्यांची पहिली रचना असावी. घेगड़े यांनी खुप पुस्तिका लिहिलेल्या आहेत. यामधे १. अस्पृश्य तारा मावळला, २. विद्वानास वंदन , ३. स्वातंत्र्याची मोहिम, ४. मृतूच्या जबड्यात, ५. दलित समाजोन्नतीपर गाणी, म्हणी, उखाणे वगैरे, ६. दलित राष्ट्र पद्द्यावलि हे आहेत. घेगड़े यांचे सर्वात लोकप्रिय गीत महाराच प्वार बिट्या लइ हुशियार हे दलित राष्ट्र पद्द्यावलि या पुस्तकामधे समाविष्ट आहे. ही रचना १९३८ सालची आहे. याच वर्षी १२,१३ फेब्रुवारी रोजी मनमाड येथे भरलेल्या मागासवर्गीय रेल्वे कामगार परिषदेस डॉ. बाबासाहेब आम्बेडकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याचवेळी यावेळी शाहिर घेगड़े यानी प्रथम ही रचना सादर केली.
घेगड़े यांनी हिंदी राजकारणाचे बाजार या शीर्षकाची कविता राजकीय, व्यंगात्मक व रूपकात्मक आहे. तत्कालीन राजकारणात कॉंग्रेस, हिन्दू महासभा, मुस्लिम लीग व कम्युनिस्ट पक्ष स्वराज्य हे लक्ष डोळ्यासमोर ठेऊन आपआपली भूमिका वठवित होते. या स्वराज्याच्या बाजाराला निघालेल्या विविध पक्षरूपी गौळणीचे स्वभाव, धेय्यधोरणे, राजकीय भूमिका कशा होत्या याचे मार्मिक चित्र रंगविताना घेगड़े म्हणतात
हिंदी राजकारणाच्या बाजारी
निघाली कॉंग्रेसची वृद्ध नारी।
हठवादी टी भारी असे
अहिंसेचे टीला भरले पिसे।
तत्व हुकली, मार्ग चुकली
स्वराज्य मिळेल कैसे ?
No comments:
Post a Comment